राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS)- ८ वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी

NMMS परीक्षेचा निकाल येथे पहा

Check NMMS exam result Here

केंद्र शासनामार्फत ही शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्या मार्फत या योजनेसाठी इयत्ता ८ वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. दरवर्षी साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान परीक्षेची जाहिरात निघते व फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान परीक्षा पार पडते. आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणासाठी सहाय्य व्हावे हा या योजनेचा हेतु असतो. 

  • पात्रता:
  1. इयत्ता ८ वी वर्गात शिकणारे असे विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी आहे
  2. विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी विद्यालय या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकत नाहीत, तसेच शासकीय वसतिगृहात राहणारे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला बसू शकत नाहीत
  3. इयत्ता ७ वी मध्ये ५५% असणे आवश्यक (SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५०% असणे आवश्यक)
  4. तहसिलदार/तलाठ्यांकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला शाळेत जमा करणे आवश्यक
  • परीक्षा फी:
  1. सर्व विद्यार्थ्यांसाठी १०० रु इतकी परीक्षा फी आहे
  2. शाळेमर्फत विद्यार्थी परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात
  • परीक्षेचा पॅटर्न:
  1. बुद्धिमत्ता चाचणी हा ९० गुणांचा ९० प्रश्न असलेला पेपर १
  2. योग्यता चाचणी हा ९० गुणांचा ९० प्रश्न असलेला पेपर २
  3. प्रत्येक पेपर साठी दीड तासाचा वेळ व दोन पेपर च्या मध्ये १ तास ब्रेक (मधली सुटी)
  4. योग्यता चाचणी मध्ये ८ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमवार आधारित सामान्य विज्ञान ३५ गुणांसाठी, समाज शास्त्र ३५ गुणांसाठी व गणित २० गुणांसाठी
  • मेरीट मध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती:
  1. दरमहा १००० रु प्रमाणे वार्षिक १२००० रुपये 
  2. इयत्ता ९ वी ते १२ पर्यन्त ही शिष्यवृत्ती मिळते
  3. शिष्यवृत्ती निरंतर मिळण्यासाठी ९ वी व ११ वी ला ५५% मिळवणे आवश्यक तर १० वी ला ६०% मिळवणे आवश्यक (SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५% सूट)
  4. साधारण ११ हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेसाठी महाराष्ट्रातून निवडले जाते
  • परीक्षेचे महत्व:
  1. आर्थिक दुर्बल विद्यार्थी ही परीक्षा पास होऊन त्यांचा ९ वी ते १२ वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च भागवू शकतात
  2. इतर शालेय परीक्षांच्या तुलनेत सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारी परीक्षा व योजना
  3. मेरीट मध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांची खूप वाह वाह होते
तुळजाई करियर अकॅडमी मध्ये या परीक्षेसाठी संपूर्ण मार्गदर्शन नाममात्र शुल्क आकारून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने केले जाते, सराव परीक्षा घेतल्या जातात. गरीब विद्यार्थ्यांसाठी कसलीही फी आकारली जाणार नाही. या परीक्षेसाठी आवश्यक पुस्तक तुळजाई करियर अकॅडमी मध्ये उपलब्ध.

आम्हाला Facebok वर follow करा- follow करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा- ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पण्या